BREAKING NEWS

Breking Amravati :-www.vidarbha24news.info

Saturday, September 2, 2017

संत्राफळावर पांढर्‍या माशीचा प्रादुर्भाव शेतकरी हवालदिल शासनाने त्वरीत मदत द्यावी

चांदुर रेल्वे - (शहेजाद खान ) - 


बळीराजा रात्रंदिवस परीश्रम घेऊन आपल्या काळ्या आईच्या कुशीतून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करीत असतांना अस्मानी संकट केव्हा येईल व ह्याचे उत्पन्न केव्हा नष्ट होईल हे सांगता येणे कठीण बाब झालेली आहे. अशातच तालुक्यात काही संत्रा उत्पादक शेतकर्‍यांच्या संत्रा बागामध्ये थोडा थोडा का होईना संत्रा झाडांवर दिसत होता आणि भाव सुध्दा चांगले असल्याचे ऐकावयास येत असतांनाच अचानक ह्या संत्रा फळांवर पांढर्‍या माशीचा प्रादुर्भाव दिसत असून सगळे बगीचे खाली होतांना दिसत आहे. यामुळे शेतकरी खूपच हवालदिल झालेला दिसत आहे.
 चांदुर रेल्वे तालुक्यात संत्राबागा बर्‍यापैकी असून यामध्ये १० ते २० टक्के शेतकर्‍यांच्या शेतात आंबीया बहाराची संत्री दिसत होती व ह्या संत्राला भाव सुध्दा बर्‍यापैकी मिळणार ह्या आशेने शेतकरी सुखावला व ह्या थोड्या थोड्या का होईना आलेल्या संत्राबागांवर इकडून - तिकडून पैसा आणून अनेक प्रकारच्या फवारण्या, खते, पाण्याचा बरोबर लागेल तसा तसा उपयोग आदिंवर भर देऊन रंगीत स्वप्न रंगविणार्‍या ह्या  बळीराजाची या ऑगस्ट महिन्यात परिस्थिती मात्र विचित्र दिसत आहे. कारण संत्रा फळ एक महिना ते दीड महिन्यात तोडण्यासाठी येत असून आता मात्र पांढर्‍या माशीचा ह्या संत्रांवर डंख दिसत आहे. यामुळे हे डंख मारलेले संत्री खाली गळताना दिसत आहे. फुलांपासून, बहारापासून, लहान-लहान फळांपासून मोठी फळे जेव्हा तयार झाली तेव्हा मात्र असे अस्मानी संकट ह्या बळीराजांवर यावे ही फारच दुर्दैवी बाब म्हणावी लागले. या अगोदर जुन जागते नागरिक म्हणाचे की, ज्यांच्याकडे संत्राबागा, मोसंबी बागा, निंबू बागा आहेत अशा बगाईतदार शेतकर्‍यांना उत्पन्न हमखास होते व ज्याची प्रगती अचानकपणे नुकसन होत असेल तर ह्या बाबीला काय म्हणावे? म्हणून निसर्गाच्या भरवशावर अवलंबून राहणार्‍या शेतकर्‍यांच्या शेतात केव्हा कोणती नैसर्गिक आपत्ती येईल ही बाब सांगणे कठीण आहे.
  यामुळे हा बळीराजा आत्महत्या सारख्या अघोरी मार्गाचा अवलंब करण्याअगोदर त्याला वेळीच मायबाप शासनाने संत्रा बागाईतदार शेतकर्‍यांना हेक्टरी १ लाख रूपये मदत द्यावी, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकरी अरूणराव शेळके, शिवाजीराव चौधरी, सुरेशराव सोळंके, मनोहर वाघ, राजाभाऊ भैसे, नंदकिशोर खेरडे, आशुतोष गुल्हाने, सुरेशराव वाघ, महात्मे साहेब, राजुभाऊ चौधरी, मदनभाऊ पाठक, मोहन दुबे, दिपक गोरडे आदिंनी केली आहे.

Wednesday, July 12, 2017

*2 lac transactional SMS Just in Rs.14000/- only*

Super Offer

*2 lac transactional SMS
Just in Rs.16500/- only*
Sms DND / Non DND
100% Delivery
Online Reports
Call 9421719953

Wednesday, July 5, 2017

चंद्रपूर बसमध्ये बलात्कार प्रकरणी 3 जणांना अटक - बस चालक,क्लिनर, व हेल्पर ला अटक

अंबाबाई मंदिर पुजारी हटाव मोहीम - जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी सुरु

Tuesday, July 4, 2017

चार मास के लिए भगवान विष्णु शयन करने जाएंगे, नहीं होंगे कोई धार्मिक कार्य



मान्यता है कि आषाढ़ शुक्ल एकादशी के दिन चार मास के लिए भगवान विष्णु शयन करने चले जाते हैं। यह नारायण के शयन एवं नर के जागरण का काल है। मान्यता है कि भगवान के शयन करने की अवधि के दौरान धार्मिक कार्य नहीं किए जाते। यह काल चातुर्मास कहलाता है।
इस एकादशी को देवशयनी एकादशी, महाएकादशी, आषाढ़ी एकादशी, पद्मनाभा एकादशी एवं हरिशयनी एकादशी भी कहते हैं। देवशयनी कथा : सूर्यवंशी राजा मान्धाता सत्यवादी एवं बड़े प्रतापी थे। उनके राज्य में एक बार भीषण अकाल पड़ा। राजा इस कष्ट से मुक्ति पाने के लिए सैनिकों के साथ जंगल की ओर गए। वहां उन्होंने ब्रह्मा के पुत्र अंगिरा ऋषि का आश्रम देखा। राजा ने अपनी समस्या ऋ षि को बताई। अंगिरा ऋ षि ने उन्हें देवशयनी एकादशी व्रत का पालन करने को कहा।

नहीं होंगे चार महीने विवाह
देवशयनी एकादशी से देव सो जाएंगे। इसके साथ ही चातुर्मास लगने से अगले चार महीने विवाह नहीं होंगे।   देव उठनी एकादशी से भगवान के जागने के साथ ही विवाह के मुहूर्त फिर एक महीने तक बनेंगे। इस अवधि में लोग सिर्फ भगवान के भजन-कीर्तन कर सकेंगे। चातुर्मास में शादी-ब्याह, उपनयन संस्कार, मुंडन संस्कार आदि सभी मांगलिक कार्य ये सभी वर्जित हैं ।

Monday, July 3, 2017

वारकऱ्यांच्या राहुटीवर भिंत कोसळली, एकाचा मृत्यू

पंढरपूर येथील गेंड वस्ती परिसरात उतरलेल्या वारकऱ्यांच्या राहुटीवर बाजूची संरक्षक भिंत कोसळल्याने एक भाविक जागीच मृत्यू झाला तर 2 महिला भाविक जखमी झाल्या आहेत.

राज्यभरातून आलेल्या दिंड्या पंढरपुरच्या वेशीवर दाखल झाल्या आहे. लाखो वारकऱ्यांनी पंढरपूर नगरी वारकऱ्यांनी फुलून गेलीये. गेंड वस्ती परिसरातही भाविकांनी गर्दी केलीये. आज दुपारी वारकऱ्यांच्या एका राहुटीवर बाजूची संरक्षण भिंत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात एका वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
रामकिशन माधवराव कराळे (वय 70 वर्षे) रा.पिंगळी (कोथळी) ता.,जि. परभणी असं मयत वारकऱ्याचे नाव आहे या दुर्घटनेत सुमनबाई तुकाराम कुदळे (वय 65 वर्षे) आणि मंजुळाबाई दत्तात्रय कुदळे (वय 60 वर्षे) अशी जखमी झाल्या वारकऱ्यांची नावं आहेत. दोघीही जिंतूर, जि. परभणी येथील आहेत. 

चायना कि कंपनी XIAOMI ने बेचे REDMI 4 के ३० दिनों में 1 मिलियन यूनिट


Sunday, July 2, 2017

95 रुपयांत अनलिमिटेड कॉलिंग आणि 24 जीबी डेटा

 भारतीय दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवलेल्या रिलायन्स जिओ या कंपनीने जीएसटी सॉफ्टवेअर वापरकर्त्यांसाठी जीएसटी रेडी स्टार्टर कीट लॉन्च केले आहे. जिओनं स्वतःच्या वायफाय डिव्हाईससोबत जीएसटीसाठी मोबाईल बेस्ड सॉफ्टवेअर सोल्युशन सेवेत आणले आहे. कंपनीच्या या ऑफरनुसार अनलिमिटेड कॉलिंगसह वर्षभरासाठी 24 जीबीचा डेटाही मिळणार आहे.

शहरात वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न



चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )



राज्य शासनाने `एकच लक्ष्य-दोन कोटी वृक्ष’ या संकल्पानुसार संपूर्ण राज्यभरात लोकसहभागातून वृक्षलागवडीचे `हरित मिशन’ राबविले आहे. या मिशनला शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
    शहरातील शिवाजी नगर परीसरासह अनेक ठिकाणी राज्य शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवडीच्या योजनेअंतर्गत शनिवारी नगर परीषदेतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवाजी नगर परीसरात नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खूने, विरोधी पक्ष नेता संजय मोटवानी, गटनेता वैभव गायकवाड, सभापती महेश कलावटे, सतपाल वरठे आदींनी वृक्षारोपण केले. पाणी टंचाईवर मात आणि पर्यावरणाचे रक्षण करणे यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायले हवेत असे मत उपस्थित मान्यवरांनी केले. यावेळी सर्व नगरसेवक, नगर परीषदेचे कर्मचारी, न.प. शिक्षक, नागरीक, विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

थरारक वातावरणात लॉच झाले 'लपाछपी'चे ट्रेलर

अंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये झळकलेला 'लपाछपी' हा सिनेमा १४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. मिडास टच मुव्हीजचे जितेंद्र पाटील व वीना पाटील आणि वाईल्ड एलीफंट मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अरुणा भट व सुर्यवीरसिंग भुल्लर निर्मित या सिनेमाने आंतर राष्ट्रीय स्तरावर भारतीय हॉरर सिनेमांचा नवा आयाम रुजवला आहे. दिग्दर्शक विशाल फुरिया कृत 'लपाछपी'चा हा बोलबाला आता महाराष्ट्रात देखील होताना दिसत आहे. महालक्ष्मी येथील फेमस स्टुडियोमध्ये या सिनेमाच्या ट्रेलरचे नुकतेच अनावरण करण्यात आले. 



आजूबाजूला उसाचे शेत, काळोख, आणि ट्रांजिस्टवर घुमणारे 'लपाछपी'चे गाणे अशी वातावरण निर्मिती करत, या सिनेमाचा ट्रेलर लॉच करण्यात आला. सिनेमाचा ट्रेलर पाहताना 'लपाछपी' सिनेमातील हॉररची कल्पना येते. अभिनेत्री पूजा सावंत या ट्रेलरमध्ये एका नव्या रूपातच लोकांसमोर येत असल्यामुळे, तिच्या चाहत्यांना देखील तो आच्छर्याचा धक्का ठरत आहे. यात ती ८ महिन्याची गरोदर महिला असून, आपल्या बाळाला वाचवण्यासाठी तिची धडपड या ट्रेलरमध्ये दिसून येते. विशेष म्हणजे हा ट्रेलर अधिक हॉरर करण्यासाठी एक्स्ट्रा साऊंड इफेक्टचा वापर करण्यात आल्यामुळे, ट्रेलर पाहणाऱ्यांचा थरकाप उठल्याशिवाय राहत नाही. 
एव्हढेच नव्हे तर, रेखा भारद्वाज यांनी गायलेले 'लपाछपी' सिनेमातील बालगीत देखील रसिकांच्या अंगावर काटा उभा करून जातो. 'एकच खेळ लपाछपीचा...' असे बोल असणारे हे गाणे या सिनेमाच्या 'भीती' ला योग्य न्याय देतं. सिनेमातील या गाण्याच्या नंदिनी बोरकर मूळ गायिका असून, स्वयेश्री शसीन वर्धावे यांनी हे बालगीत लिहिले आहे. शिवाय रंजन पटनाईक, टॉनी बसुमातरी आणि उत्कर्ष धोटेकर या तिघांनी गाण्याचे संगीतदिग्दर्शन केले आहे. 
या सिनेमाची कथा दिग्दर्शक विशाल फुरिया आणि विशाल कपूर यांनी लिहिली आहे. 'लपाछपी' हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट भयपट ठरण्याची शक्यता असल्याचा अंदाज, सिनेमाचा ट्रेलर पाहताना होतो.  
पूजा सावंतची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमात उषा नाईक, अनिल गावस आणि विक्रम गायकवाड या कलाकरांचीदेखील भूमिका असून, आतापर्यंत खुमासदार मनोरंजांच्या दुनियेत मश्गुल होत असलेल्या सिने चाहत्यांसाठी हा सिनेमा मनोरंजनाचा थरकाप उडवणारा ठरणार आहे.

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.